Payal Book
Sthalantar स्थलांतर by Alka kulkarni
Couldn't load pickup availability
महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश आदिवासीबहुल पट्टयात नक्षल वादाने ठाण मांडले आहे. नक्षलवादी जंगलावरच जीवन असलेल्या आदिवासींना वेठीला का धरत आहेत ? एखाद्या विचारसरणीच्या तत्त्वात आणि आचरणात तफावत का निर्माण होते ? आदिवासी समाज पोलीस आणि नक्षलवादी ह्या पैकी कोणाकडे झुकतो आणि का? ह्या विचारसरणीच्या प्रभावाने आदिवासी समाज सुखी झाला आहे का?अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक प्रश्नाचा ऊहापोह करणारी कादंबरी .ही पूर्णत : काल्पनिक कादंबरी एखादा आदिवासी समाज पिढ्या न पिढ्या त्याच्या पद्धतीने जगत असतो अशा वेळी एखाद्या विशिष्ठ विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर सत्ता मिळवली , तर काय परिणाम होतात , या सुत्राभोवती हि कादंबरी फिरते . सामाजिक आणि भावनिक बदल मांडणारी भरकटलेल्या मनांची हि कथा आहे

