Skip to product information
1 of 2

Payal Books

MUMBAI AFTER AYODHYA by JITENDRA DIXIT

Regular price Rs. 467.00
Regular price Rs. 520.00 Sale price Rs. 467.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publications
गेल्या तीन दशकांत मुंबईने जे अनपेक्षित असे पाहिले, भोगले, अनुभवले त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. अयोध्या घटनेनंतर माफिया जगतातील घडामोडींनी समाजकारण आणि राजकारणही बदलले. सोबतच मुंबईचे भौगोलिक रूपदेखील बदलले. नवीन उपनगरांची आणि वस्त्यांची निर्मिती झाली. शहर दंगलीतून बाहेर पडून नि:श्वास सोडत नाही, तोच पुन्हा २००२मध्ये झालेली बॉम्बस्फोट मालिका आणि २००८मधील २६/११चा दहशतवादी हल्ल्यामुळे हिंसेने परमोच्च सीमा गाठली. जीतेंद्र दीक्षित हे याच शहरात जन्माला आले आणि इथेच वाढले. ज्या तीन दशकातील घडामोडींबद्दल त्यांनी वर्णन केले आहे, त्यातील बराच काळ त्यांनी स्वत: अनुभवला आहे. त्यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मुंबई शहराची आत्मकथा. गिरण्यांचे शहर ते मॉलचे शहर झालेली मुंबई, इथे गगनचुंबी इमारती वैÂक पटींनी वाढल्या. शहराची जीवनवाहिनी असणारी लोकल ट्रेन लांबीने वाढतच गेली, तरीही गर्दीला सामावून घेणे, मुंबईला अवघड जात आहे. जगातील सर्वांत मोठं सिनेजगत असणारं बॉलिवुडही या विळख्यातून सुटले नाही. इथं चित्रपटकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. येथील पारंपरिक, ऐतिहासिक गणेशोत्सव आणि दहीहंडीसारखे उत्सव भक्तिभावरहित झाले आहेत आणि त्यांचे व्यापारीकरण झाले आहे. अत्यंत महत्त्वाचे घटनाक्रम, शहराला मुंबई म्हणून घडवणार्या लोकांची माहिती आणि मुंबईच्या व्यक्तिमत्त्वातील बदलाचे वर्णनही या पुस्तकात अनुभवास येते. शहराची भौगोलिक स्थिती, नागरी समस्यांचा चढता आलेख, गजबजलेले अर्थकारण, रिअल इस्टेटचा बुजबुजाट आणि राजकारणाची शंभर शकले, असे सगळे एकत्रित वाचायला मिळते.