एकविसाव्या शतकामध्येही महार वतन इनामी हक्क जमिनीचे अस्तित्व कायम आहे. सदरील मिळकत महार वतन जमीन असून ही कुठल्याच जी.आर.नुसार किंवा खरेदीद्वारे हस्तांतरण होत नाही. ती फक्त 99 वर्षांच्या करारासह भाडेपट्ट्यावर देता येते. महार वतन जमिनीचे खरेदीखत जरी करून दिले असेल तरी ती जमीन वतनी असल्यामुळे हस्तांतरण होत नाही. मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या मतानुसार एखाद्या चुकीच्या बाबीसाठी मुदतीचा कायदा लागू होत नाही. त्यामुळे सदरील जमिनीवर हक्क असल्यास, खटला दाखल करण्यास उशीर झाला असे म्हणण्याची आवश्यकता नाही. कारण 50 ते 100 वर्षांनंतरही प्रकरण दाखल करता येते आणि ती जमीन महारवतनी मालकाला व वारसाला परत मिळू शकते. या पुस्तकात दिलेली याविषयीची सखोल माहिती माझ्या प्रदीर्घ वकिली व्यवसायाच्या अनुभवातून हाती लागलेली असून वाचकांसाठी ती महत्त्वपूर्ण ठरेल यात शंका नाही.
Payal Books
Mahar Watan ani mahatvache kayade | महार वतन आणि महत्त्वाचे पूरक कायदे by AUTHOR :- Adv. Pradip Tapse Patil
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
