Payal Books
Kille Jinjee - किल्ले जिंजी by Mahesh Tendulkar
Couldn't load pickup availability
शिवाजी महराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने राज्य केले. स्वराज्याची स्थापना केली. प्रथम राजगड व नंतर रायगड हे त्यांचे राजधानीचे गड होते. या व अन्य गडांचा परिचय शिवप्रेमींना आहे. पण महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांचा फारसा परिचय नसतो. त्यापैकी एक आहे किल्ले जिंजी. तामिळनाडूतील वेलुप्पुरम जिल्ह्यातील जिंजीला शिवाजी महाराजांची तिसरी राजधानी मानतात. त्यांच्यानंतर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने स्वराज्याची पुनप्रतिष्ठापना केली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे रणशिंग फुंकले. संताजी - धनाजींनी याच काळात पराक्रम गाजविला. जिंजीच्या रोमांचकारी इतिहासात पराक्रम, धाडस, मुत्सद्देगिरी, समयसूचकता, राजकारण आहे. हा इतिहास महेश तेंडुलकर यांनी 'किल्ले जिंजी'मधून सर्वसामान्यांपर्यंत पोचविला आहे.

