द्वापार युगाचा अंत आणि कलीयुगाची सुरुवात- कलीयुगाचा काल ४,32,000 वर्षांचा मानला जातो. ‘द्वापार युगाच्या अंतानंतर भारतात ७११ मध्ये महमंद बिन कासीमने पहिले आक्रमण केले, त्यानंतर अरबांनी राजस्थान, गुजरातवर आक्रमण केले. गुर्जर – प्रतिहार साम्राज्याचा संस्थापक नागभट व चालुक्य सरदार पुलकेशी यांनी अरबांना पराभूत करून सिंधू पार हाकलले. शहाबुद्दीन घोरी, कुतुबुद्दीन ऐबक अशी अनेक आक्रमणे मुस्लिम सत्तेची स्थापना होण्यास कारणीभूत झाली, छत्रपती शिवाजी राजांचा हिंदवी स्वराज्याच्या काळात इस्लामी सत्तेला बरेच हादरे बसले. औरंगजेबाचा तो ऱ्हासाचा काळ ठरला. त्यानंतर पेशवेकालात बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्याचा उत्कर्ष झाला. त्यानंतर ब्रिटिश राजवट म्हणजे पारतंत्र्याचा काळ होय. त्यानंतर हिंदू-मुस्लिम तंटे, त्यानंतर फाळणी, कलियुगाने विज्ञानात प्रगती केली. पण त्यामुळे त्याच्या चुकीच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी वृत्तीत झालेले आत्मकेंद्री बदल, ही कालीयुगातील आव्हाने लेखकाने मांडली आहेत. चंगळवादाचा अतिरेक हीपण कलीयुगातील एक मोठी समस्या आहे, याचे भानही लेखक देतात.
Payal Book
Kaliyug by Anil shinde
      Regular price
      
        Rs. 313.00
      
    
    
        Regular price
        
          
            
              Rs. 350.00
            
          
        Sale price
      
        Rs. 313.00
      
    
    
      Unit price
      
        
        
         per 
        
        
      
    
  Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

