Payal Books
Jotiba Phule ( जोतिबा फुले )
Couldn't load pickup availability
शिक्षण क्षेत्रात फुले यांचे काम सुरू असतानाच एकूण समाजाला आपल्या भोवतीच्या वास्तवाची जाणीव करून देणे आणि पुढचा मार्ग दाखवणे हा देखील त्यांच्या आयुष्याचा हेतू, त्यातूनच वृत्तपत्रातून लेखन ते करत होतेच, त्याचबरोबर त्यांनी गुलामगिरी हे पुस्तक १८७३ शेतकर्यांचा आसूड १८८३ इशारा १८८५ सार्वजनिक सत्यधर्म १८८९ ही पुस्तके प्रसिध्द केली होती. ह्या पुस्तकांमधून त्यांनी हिंदू समाजाच्या जातिव्यवस्थेच्या योग्यतेलाच आव्हान दिले. वैदिक परंपरा, ब्राह्मणांचे धर्मग्रंथ, पुराणग्रंथ ह्यांना आव्हान दिले. ब्राह्मण जातीची श्रेष्ठता आणी भटजीगिरी ह्यांनी आव्हान दिले. समानता, न्याय, स्वतंत्रता आणि सत्य ह्या मुद्यावरून त्यांनी शूद्र, अतिशूद्र स्त्रिया ह्यांच्या मुक्ततेसाठी सामाजिकता, धार्मिकता ह्यांची चळवळ उभी केली.
